Tathagat Vidhyalay-Karbhand
नागपूररामटेक

महाराष्ट्र शासनाकडून खावटी चे २००० रुपये आता आतापर्यंत खुपश्या कुटुंबाला आलेले नाही: ग्रा.पं. सदस्य रवि कठौते

महाराष्ट्र शासनाकडून खावटी चे २००० रुपये आता आतापर्यंत खुपश्या कुटुंबाला आलेले नाही: ग्रा.पं. सदस्य रवि कठौते

अखिल आदिवासी कोल समाज विकास संस्था व ग्रा.पं. सदस्य कांद्री माईन शाखा द्वारे महाराष्ट्र शासनाकडून खावटी चे २००० आता आतापर्यंत खुपश्या कुटुंबाला आलेले नाही, त्या संदर्भात अर्ज दाखल

दि. 07/09/22  ला प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग, नागपूर यांना रवि कठौते अध्यक्ष अखिल आदिवासी कोल समाज विकास संस्था व ग्रा.पं. सदस्य कांद्री माईन शाखा यांचा कडून विनंती अर्ज देण्यात आले

महाराष्ट्र शासनाकडुन खावटी वाटप ची योजना राबविण्यात आलेली होती त्या योजने अंतर्गत आदीवासी कुटुंबाला 2000 चे धान्य (किराना) व 2000 रु  बैंक खाते मधे देण्यात आले परंतु बहुतेक लोकांना धान्य (किराना) मिळालेला आहे, पण त्यांच्या खात्यामध्ये 2000 रु आता पर्यत आलेले नाही तरी ज्यांना आता पर्यंत 2000 रू देण्यात आले नाही. त्यांची चौकसी करून लवकरात लवकर रामटेक तालुकातील आदीवासी गरीब कुटुंबाला या योजनेचा लाभ दयावा. हि विनंती केली व या अर्जात तात्काळीने प्रकल्प अधिकारी साहेबांनी दखल घेऊन संबंधित अधिकारीला बोलवुन मंजुर यादी पाहुन कोणा-कोणा पैसे जमा झाले आहे ते सांगितले व इतर लोकांचे लवकरात लवकर  कळवण्यात येईल अशी हमी दिली.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!